– प्रहार जिल्हाध्यक्ष आंदोलनाचा इशारा*
गोदिया :- जिल्हा धान पिकवणारा जिल्हा तांदूळ नगरी ओळख आहे. जिल्ह्यात विकास पुरुष, भुमीपुत्र व स्वतः ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे खासदार, आमदार, फक्त आपल्या स्तरावर पत्र देऊन निधी आम्ही आणली, धान खरेदी, केन्द्रं आम्ही चालू केले असा दिखावा करतात परंतु मोठ्या प्रमाणात या नेत्याच्या डोळ्यासमोर शेतकरी रोज तिळ,तिळ मरतो यांना दिसत नाही याचे कारण संत्तापक्ष असो विपक्ष संगळे आधार भुत धान खरेदी केन्द्रं याचेच आहेत शेतकऱ्यांना दाटफटकार करुन प्रतिक्विंटल तिन,चार कीलो धान कापले जातात, सरसकट धरमकाटा करून आणा कीवा सरळ शेतकऱ्यांच्या बोरा मधे धान खरेदी चालू आहे.आनलांईन नोदंनी करण्यासाठी शंभर रुपये पासून पाचशे रूपये पर्यंत सर्रास केद्रांवर माणूस पाहून मागणी चालू आहे. मग प्रश्न न निर्माण होतो शासनाने दिलेला बारदाना कुढे जातो सरसकट धान मोजण्यासाठी सरकारने परवानगी दिली का? धरमकाटा चालतो तर प्रत्येक धान खरेदी केद्रांवर धरमकाटा बसविण्यात यावे.कुढलेही नियम धान खरेदी केद्रांवर पाळले जात नाही फक्त गरीब शेतकऱ्यांना त्रास देणे चालू आहे.नोदंनी करण्यासाठी शेतकऱ्यांना कुढलेही माहिती देत नाही फक्त अति जवळपास च्या आपल्या लोकांना फोन करून बोलवून नियम बाह्य खरेदी चालू करण्यात आली आहे. हे संगळे कारणामे फक्त आपल्याला पेमेंट लवकर कसा मिळेल याची सोय सर्व करीत आहे या संपूर्ण प्रकारात सर्व सामान्य तळागाळातील शेतकरी भरडला जात आहे.यांच्या या कारणांमुळे आतापर्यंत काही शेतकरी बोनस पासून वंचित आहेत. तसेच रब्बी हंगामातील धान चुकारे अजून झाले नाही हे या सरकार ला व विपक्ष यांना दिसत नाही. कारण सर्व धान खरेदी केन्द्र याचेच आहेत. म्हणून तु भी चुप मै भी चुप असी खेळी चालू आहे फक्त निवडणूक आली की घोषणा करतात प्रत्येक्ष अमलंबजवनी शुंन्य सरकार च्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.बोनस व रब्बी चे पेमेंट आठ दिवशात केले नाही तर पणन अधिकारी यांच्या दालनात प्रहार जिल्हा अध्यक्ष महेंद्र भांडारकर आदोलन करणार असल्याचा इशारा दिला.




