नागपुर ०९: आजच्या देशव्यापी संपात आपली बसच्या रेशनवर परिणाम झाला असून संप 60 टक्के यशस्वी झाल्याचा दावा युनियनने केलेला आहे. संपाच्या देशव्यापी मागणी व्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांचा अध्यादेश लागू करा व किमान 26000 रुपये वेतन द्या अशा प्रमुख मागण्या करीत मोरभवन असून संविधान चौकापर्यंत मोर्चा नंकाढण्यात आला. स्थायी नोकऱ्यांऐवजी ठेका कामगारांना प्राधान्य देत असल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा प्रचंड परिणाम होत असून ती सावरण्यासाठी स्थायी रोजगाराचे जनकल्याणकारी पाऊल सरकारने उचलावे या हेतूने अशा मागण्या करण्यात येत आहेत. आपली बस कामगारांनी संपात भाग घेऊन कामगार वर्ग सोबत आपली एकजूटता कायम करीत मोठ्या प्रमाणात संविधान चौकातल्या सभेत भाग घेतला.



