Saturday, March 14, 2026
spot_imgspot_img
spot_img

वन्यप्राणी हल्ल्यांच्या विरोधात धरणे आंदोलन

– देवलापार जनहित संरक्षण समितीचे आयोजन

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक:- तालुक्यातील देवलापार परिक्षेत्रात वाढत चाललेल्या मानव–वाघ व जंगली जनावरांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवळापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समितीच्या वतीने (दि.१२) मार्चला अप्पर तहसीलदार कार्यालय परिसर, देवलापार येथे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, युवक व विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. वाघ व जंगली जनावरांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. या आंदोलनात परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, युवक व विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. वाघ व जंगली जनावरांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. समितीच्या वतीने शासन व प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी देवलापारच्या अप्पर तहसीलदार पुनम कदम यांचे हस्ते शासनास निवेदन सादर करण्यात आहे. प्रश्न मिटेपर्यत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. यावेळी विजय कोकोडे, हरिश उईके, हरिश्चंद्र सिरीयाम, महेश ब्रम्हनोटे, रमेश कुमरे, शांता कुमरे, मुकेश दुबे, उपेश उईके, प्रविण उईके, विनोद मरस्कोल्हे, मोहीन पठाण, सरला खंडाते, सारीका उईके, दुर्गावती सरियाम, रामचंद्र अडमाची,आकाश पंघरे, प्रतिक डोंगरे, राधेश्याम उईके ,चिंतामण वरकडे, धर्मराज वरकडे, कृष्णकुमार वरकडे, धर्मराज कोकोडे, चंद्रकांत कोडवते, नितेश ब्रम्हनोटे, शहारू मरस्कोल्हे, विलास उईके, उमेश भांडारकर, छाया भट्टी, कल्पना भलावी, कल्याणी घुर्वे आदी उपस्थीत होते. यावेळी वनविभागातर्फे देवलापारचे वनपरीक्षेत्र अधिकारी शेषराव टुले, पवनीचे सागर बंसोड,पिपरियाचे विवेक राजूरकर, देवलापार (मानसिगदेव) अभीजीत ईलमकर, एकसंघ नियंत्रकचे लक्ष्मीकांत ठाकरे, जयेश तायडे, वनपरीक्षेत्र अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कोनताही अनुचीत घटना घडू नये म्हणून ठाणेदार नारायन तुरकुंडे यांनी कडक बंदोबस्त लावला होता. तर ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ संजय मेश्राम यांनी त्यांचे पथक हजर ठेवले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com