spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कर्ज निवारण योजनेच्या लाभासाठी बँकांकडे आधार माहिती देणे आवश्यक; जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे यांची माहिती

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतक-यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दिर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या हिताकरीता संभाव्य शेतकरी कर्ज निवारण योजना २०२६ ही योजना तयार केली आहे.

या योजनेत आधार क्रमांक अनिवार्य असल्याने ज्या थकीत शेतकऱ्यांचे आधारकार्ड बँकेमध्ये व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये उपलब्ध झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले कर्ज निवारण होऊन थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक होण्यासाठी आपले आधारकार्ड व इतर संबंधीत माहिती बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे गटसचिव यांचेकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था शुध्दोधन कांबळे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.