spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

 मुख्यमंत्र्यांच्या शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात?

 

नागपूर २६ : उपराजधानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर… तरीही शहर महिलांसाठी असुरक्षित होत चालले आहे, हा कटू सत्याचा वास्तव प्रश्न आज प्रत्येक नागपूरकराच्या मनात घुमत आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या तीन भीषण घटनांनी उपराजधानी हादरली आहे — बलात्कार, लुट, विनयभंग… गुन्हेगार निर्भय, महिला भयभीत!

प्रश्न असा आहे की, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची यंत्रणा कितपत सज्ज आहे?
नागपूरसारख्या मोठ्या शहरात, तेही मुख्यमंत्री राहत असलेल्या उपराजधानीत, अशा सलग घटना घडणे हे चिंताजनकच नाही तर प्रशासनावर मोठा प्रश्नचिन्ह उभं करतं. गुन्हेगारांची धाडस दिवसेंदिवस वाढत आहे आणि महिला सुरक्षिततेची हमी देणारी यंत्रणा मात्र केवळ आश्वासनांपुरतीच मर्यादित आहे का, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.

या घटना फक्त आकडेवारी नाहीत; त्या तीन महिलांच्या वेदना, अपमान आणि भीतीच्या कहाण्या आहेत. हे समाजासाठी, प्रशासनासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी गंभीर इशारा आहे. सतत घडणाऱ्या अशा गुन्ह्यांमुळे नागपूरच्या महिलांचा आत्मविश्वास ढासळत आहे. पालक, तरुणी, कामकाजी महिला, विद्यार्थीनी – सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकार, पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी याकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. केवळ कठोर कायदे बनवून समस्या सुटणार नाहीत; त्वरित आणि कठोर अंमलबजावणी करूनच गुन्हेगारांना धडा शिकवता येईल.
जोपर्यंत महिलांना रस्त्यावर, कामाच्या ठिकाणी, शाळा-कॉलेजच्या मार्गावर निर्भयपणे फिरण्याची हमी मिळत नाही, तोपर्यंत नागपूरचे “स्मार्ट सिटी” होण्याचे स्वप्न केवळ दिखावा ठरणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.