खापा :- वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, यात शंकाच नाही. पण, वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच महत्त्वाची बाब लक्षात घेऊन मुकेश पावडे मित्र परिवारातर्फे शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त वृक्षारोपण व संगोपन करून पर्यावरण पुरक नवरात्र साजरी करण्याचा संकल्प युवकांनी केला.
22 सप्टेंबर सोमवार पासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सव निमित्य खापा शहरात विविध भागात नऊ दिवसात 21 झाडे लावून, वृक्षारोपणासोबतच युवकांनी वृक्षसंवर्धन करण्याचा ध्यास घेतला. संवर्धनासाठी युवकांनी प्रतिज्ञा घेत वृक्षाची देखभाल पालनपोषण करेल, असा निश्चय केला. पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धनासाठी मुकेश पावडे मित्र परिवार आणि युवकांनी स्तुत्य पुढाकार घेतल्याने सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे.
दरम्यान, ग्लोबल वाॅर्मिंगमुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. मानवी आक्रमणामुळे जंगलतोड वाढल्याने वन्यजीव, पशुपक्षी वातावरणाला धोका निर्माण झाला आहे. वृक्षतोड हे याचे प्रमुख कारण आहे. परिणामी, अलीकडे मानवाला याचे महत्त्व कळले असून, वृक्षारोपण करण्याकडे अधिकाधिक भर दिला जात आहे. वृक्षारोपण हे महत्त्वाचे आहेच. पण, त्यासोबत त्याचे संवर्धन ही खरी काळाची गरज आहे. वृक्षाचे संवर्धन झाले तरच भविष्यातील पर्यावरण अबाधित राहील. वृक्षारोपणासोबतच सर्वांनी वृक्षसंवर्धन करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता मुकेश पावडे यांनी केले.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वृक्षारोपणचे आयोजन मुकेश पावडे, प्रज्वल नंदनवार, सचिन भैसारे, चरण गजभिये, स्नेहल सुपारे, आकाश प्रजापती, सचिन कुंभारे, मनीष मारोतकर, नीरज नाचनकर, आकाश सेरेवार, सागर सेरेवार, मकसूद शेख तसेच मुकेश पावडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे आमच्या मार्फत जास्त नाही तर काही प्रमाणात तरी निसर्गाचे संगोपन करण्याकरिता नवरात्रीच्या नऊ दिवसात 21 वृक्षाचे वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प आम्ही मित्रमंडळी मिळून केला आहे आणि तश्याप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
– सामाजिक कार्यकर्ता, मुकेश पावडे.




