spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, योगदान प्रेरणादायी – पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन

– हुतात्मा स्मारक उमरी येथे क्रांती दिन उत्साहात साजरा

– पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण

यवतमाळ :- यवतमाळ ही संघर्ष आणि स्वाभिमानाची परंपरा लाभलेली भूमी आहे. या भूमीनेही स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले असून जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी केले.

ते बाभूळगाव तालुक्यातील उमरी (शहीद) येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित क्रांती दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानहून बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन सर्व शहीद क्रांतिवीरांना मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाला शहीद पत्नी संगीता घोटेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, नगराध्यक्ष संगीता मालखुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहत्रे, कार्यकारी अभियंता माधव उघडे, तहसीलदार मीरा पागोरे, गटविकास अधिकारी ढोले, पोलीस निरीक्षक भेंडे, उप अभियंता दिपक निचळ, कनिष्ठ अभियंता कीर्ती रामेकर, स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या परिवारातील सदस्य विजय माळवी, सुरेश मळावी, सत्यदेव पाळेकर, कैलास सुलबेवार, सतीश कोटमवार, अतुल देशपांडे, कौशल्या रामटेके, नंदू बुटे, हरिभाऊ चव्हाण, शेख हसन शेख चांद, नीरज राऊत, सरपंच सोनाली शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मा यशवंत लुडबाजी पाळेकर, शहीद मधुकर घोटेकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक आणि वीरांना अभिवादन केले.

अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, आजचा दिवस देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा दिवस आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्व स्वातंत्र्यवीरांमुळे आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगत आहोत. आज स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरू असून भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. या देशातील प्रत्येक घटक देशसेवा करत आहे. शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, युवक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, अधिकारी, कर्मचारी, कामगार आदी सर्वच घटक आपल्या कामातून देशसेवेचे व्रत जोपासत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचेही पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.

आज क्रांतीदिनी जात-पात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या भिंती बाजूला ठेवून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊया आणि आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडवूया, असे आवाहन त्यांनी केले.

क्रांतिदिन ते स्वातंत्र्य दिन या कालावधीत कालावधीत १ लाख ११ हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करून यावेळी शुभारंभ करण्यात आला.

यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शाळेच्या मुलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, उमरीच्या सरपंच सोनाली शेळके, उपसरपंच वंदना धोटे, राजुदास जाधव, गजानन डोमाळे, यशवंत पवार, संजय हातगावकर, प्रद्युम्न जवळकर, आकाश राठोड, संजय रंगे, सुरेश चिंचोळकर,

सचिन महल्ले, नितीन पखाले, प्रकाश भूमकाळे, राजू पांडे, गौतम लांडगे, पप्पू पाटील भोयर, कैलास राऊत, वैभव खडतकर, निलेश काळे, अजय डोंगरे, मेघा गिरी, संतोष मिश्रा, श्रीकांत पवार, पराग चौधरी, पवन राऊत, अक्षय कुपाट, मनीष भुते आदी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.