सचिन चौरसिया, रामटेक २८ : भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभाना विशेष महत्व आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला जातो. घरोघरी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. गणपती उत्सवात सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. गणपतीच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. गणपती आल्यानंतर बाप्पाची मनोभावे पूजा करून गोडाचा मोदक पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो.
२७ आगस्टला गणराया घरा घरात विराजमान झाले. आगमन मोठ्या उत्साहात झाले. भक्तानि मोटरसायकल, चारचाकी किंवा ऑटोमध्ये गणपती घरी आणून त्याची स्थापना केली. रामटेकमध्ये कुंभार समाजातील २० कुटुंबे गणपतीच्या मातीच्या मूर्ती तयार करतात. मूर्तिकार विक्रम चौधरी यांनी सांगितले की रामटेक शहरासह ग्रामीण भागात सुमारे पाच हजार मूर्तीची विक्री झाल्याची माहिती दिली. गणेशमूर्ती ५०० ते ४००० रुपयांना विकली गेली. काही मूर्तिकार कड़े गणेश प्रतिमा शिल्लक राहिल्या. रामटेक पोलीस ठाण्याचे ठानेदार मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत ४० सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशजींची स्थापना केली आहे. यामध्ये ७ ठिकानी शहरात तर ३३ ठिकानी ग्रामीण भागात आहेत
विठ्ठलाचे स्वरूपात माझा गणराज आला.. घरोघरी बाप्पा विराजमान


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



