नागपुर :- एल्गार सैनिक एकता समिती महाराष्ट्राच्या वतीने आज के एन दाभाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सैनिकांबद्दल आपली व्यथा मांडली.माजी सैनिकांच्या व परिवारांच्या मागण्या मंजूर करण्यात याव्या. असे एल्गार सैनिक एकता समितीने पत्रकार परिषदेत आपल्या मागण्यांसाठी येणाऱ्या 13 डिसेंबर रोजी, यशवंत स्टेडियम येथून सकाळी ९ वाजता. विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये हजार सैनिकांचा सहभाग राहतील. हिवाळी अधिवेशनावर आपल्या परिवारांसाठी मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली.
पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मंचावरील माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे,कॅप्टन कमलेश्वर दाभाडे, सुचिता भोयर गुणवंत सोमकुवर यांची उपस्थिती होती.




